Wednesday, March 9, 2011

तत्वज्ञानाची शिबिरे आणि भाविकांची मानसिकता

    सध्या भारतीय तत्वज्ञानाला ग्लामर आलेले आहे.अगदी विदेशातूनही भाविकांचा लोंढा भारतीय तत्वज्ञानाच्या ओढीने वेळ आणि पैसा खर्च करून भारतात येतात आणि इथे चार सहा महिने राहून तत्वज्ञानाचे,संस्कृतीचे,योगाचे वगैरे  धडे घेतात.काही प्रसिध्द तत्वज्ञानी लोक विदेशात भारतीय तत्वज्ञानाची शिविरे घेतात.एका अर्थी ही फार चांगली गोष्ट आहे.अर्थात ज्यांना खरोखर तत्वज्ञान म्हणजे काय,हे मनापासून शिकायचं असेल,त्यांच्यासाठी! पाश्च्यात्य संस्कृतीला भारतीय तत्वज्ञानाची भुरळ तशी फार जुनी आहे.आणि ते लोक भारतीय लोकांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे याचा अभ्यास करताना दिसतात.त्यांची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन ते त्यातून वैज्ञानिक सत्य शोधण्याचा प्रयत्न करतात.त्याचा वापर स्वता:च्या आणि इतर लोकांच्या उपयोगासाठी करतात.किंवा स्वता;तील काही विशेष कौशल्यात भर घालतात.

       केवळ एक उदाहरण म्हणून सांगतो- मागे डिस्कवरी च्यानेलवर 'डेविड ब्लेन' याचे कार्यक्रम आपण बघितले असतील. हा मनुष्य जादूगार आहे.नाना करामती करतो. तो कधी शेकडो मीटर उंच चबुतऱ्यावर फक्त पाय ठेवण्याइतक्या जागेत तासनतास  उभा राहतो.तो बर्फाच्या लादीत स्वता:ला बंदिस्त करून घेतो.मागे एकदा त्याने १८ मिनिटे पाण्याखाली श्वास रोधून काढली.हे त्याला विशिष्ट योग पद्धतीच्या सततच्या अभ्यासामुळे शक्य झाले.कोणत्याही कारणामुळे  सामान्यता: ५ ते ७ मिनिटे श्वास रोधला गेल्यास आणि असा रुग्ण वा मनुष्य त्वरित वैद्यकीय मदत मिळून यागायोगाने वाचल्यास तो पुढे जगला तरी त्यास मेंदूस कायमस्वरूपी हानी  निर्माण झाल्यामुळे तो जिवंतपणी मरणयातना भोगतो.तो मुकबधीर,वा वेडा होतो.त्याला फिट्स येतात वगैरे पण डेव्हिड ब्लेनला असे काही होत नाही.त्याची तीव्र इच्छाशक्ती,आणि धाडसी वृत्ती त्याचं त्याच्या प्रत्येक साहसात रक्षण करतात.
        आता आपण आपल्या भारतीय लोकांचं बघुयात.इथे अनेक चांगली शिविरे भरवली जातात आणि त्याची फी वगैरे अगदी नाममात्र असते उदा. आर्ट ऑफ लिव्हिंग,ह्याप्पी थॉटस्,स्वाध्याय,रामदेवबाबा ,डॉ.स्नेह देसाई  वगैरे. मी स्वत: ही शिविरे अनुभवली आहेत.ज्यांना तत्वज्ञानात रुची असेल,त्यांनी जरूर जायला हवं असे मी म्हणेन.याशिवाय इतरही अनेक प्रकारची शिविरे असतात ज्यात बाबा ,बुवा आणि भोंदुगिरी चालते! त्या लोकांची नावे मी सांगत नाही कारण ती आपणास माहित असतीलच. तिथे ज्यांना जायचे त्यांनी अवश्य जावे (आपण जाऊ नका सांगीतले म्हणून कुणी ऐकेल असा माझा विश्वास नाही )तर ते असो.
            तर बऱ्याच  चांगल्या शिविरांत(इथेही मी आता कुणाचही नाव न घेता सर्वसामान्यपणे बोलत आहे) मी पाहिलं -खूप काही घेण्यासारखं निश्चितपणे असतं !पण इथे जमणारे सारेच लोक(काही सन्माननीय अपवाद वगळून) ते ज्ञान घेण्याच्या लायकीचे असतात का? असा माझा प्रश्न आहे!माझ्या मते ९०% लोक काही वैयक्तीक हेतू साध्य करण्यासाठी इथे येतात.त्यात विमा एजंट असतात,कुणी खाजगी क्लासेस वाले असतात.कुणाचा काहीतरी व्यवसाय असतो,आणि त्यांना ओळखी निर्माण करून तो वाढवायचा असतो ! कुणी कॉलेजचे विद्यार्थी असतात ते या निमित्ताने आपल्या मित्र मैत्रिणींना भेटायला येतात.,कुणी निव्वळ टाईमपास करण्यासाठी येतात.कुणी नाहीच काही तर एखाद्या अश्या ग्रुपशी नाव जोडलं गेल्यामुळे थोडी प्रतिष्ठा लाभते म्हणून येतात.कुणी आपणास तत्वज्ञानात किती गती आहे हे दाखवण्यासाठी येतात.इथे खरे भाविक फारच थोडे असतात.बहुतांशी लोक आपले क्षुद्र स्वार्थ साधण्यासाठी येतात.हे बऱ्याच लोकांना  समजते पण उघडपणे ( कदाचित स्वत:ही तसेच असल्यामुळे  ) कुणी काही बोलत नाही.
       वर्षानुवर्षे तत्वज्ञानाची शिविरे होत राहतात.बहरत जातात.भाविकांची आणि भुरट्या ,भामट्यांचीही संख्या वाढत जाते.आपले काम साधून झाले की हे लोक हळूच पळ काढतात कारण त्यांना आता अश्या शिबिरांसाठी वेळ नसतो. मात्र त्यांची जागा घेणारे दुसरे धूर्त लोक त्या जागी येतात आणि आधीच्यांची कमतरता भरून काढतात.आणि  जगण्याचे हे आधुनिक तत्वज्ञान सर्वत्र झपाट्याने पसरत राहते.त्यात खरी तत्वे आणि भाविक मध्येच कुठेतरी हरवून जातात.

No comments:

Post a Comment